My Nashik

Written by Administrator

माय नाशिक

http://mynashik.net

 

नाशिकची संपूर्ण माहिती नाशिक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, जे नाशिक जिल्ह्यात आहे. हे जिल्ह्याचे मुख्यालय आणि महाराष्ट्रातील चौथे मोठे शहर आहे. नाशिक हे गोदावरी नदीच्या काठावर आहे.

हे महाराष्ट्राच्या वायव्य भागात मुंबईपासून १५० किलोमीटर आणि पुण्यापासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर प्रामुख्याने हिंदूंसाठी प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. पंचवटी हा शहरातील सर्वात प्रसिद्ध परिसर आहे. याशिवाय परिसरात अनेक मंदिरे आहेत. सणासुदीच्या काळात नाशिकला प्रेक्षकांची मोठी गर्दी असते.

नाशिकचा इतिहास – नाशिकचा इतिहास खूप जुना आहे. रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक प्रभू रामाचा भाऊ लक्ष्मण याने तोडले होते त्या प्रसंगाने या शहराला हे नाव दिले. पौराणिक कथेनुसार, भगवान राम, देवी सीता आणि भगवान लक्ष्मण यांनी त्यांच्या १४ वर्षांच्या वनवासात पंचवटी येथे वास्तव्य केले. दर १२ वर्षांनी नाशिक कुंभमेळ्याचे आयोजन करते, ज्यामध्ये लाखो हिंदू भाग घेतात. आत्मा शुद्ध करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. पूर्वी, नाशिकवर सोळाव्या शतकात मुघल साम्राज्य आणि १८१८ पर्यंत शक्तिशाली मराठ्यांचे राज्य होते. नाशिकचे वीर सावरकर आणि अनंत लक्ष्मण कान्हेरे हे दोन उल्लेखनीय भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत.

My Nagpur

Written by Administrator

माय नागपूर

https://mynagpur.net

 

नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स. ९४०चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपूरास हलवली. त्याने जवळजवळ ३३ वर्षे राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले.राजा चांद सुलतान याच्या मॄत्यूनंतर नागपूरवर भोसल्यांचे राज्य आले.इ.स. १७४२ मधे रघूजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले. इ.स. १८१७ मध्ये सीताबर्डीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला. इ.स. १८६१ मध्ये नागपूर ही सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी झाली.

इ.स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला.त्याच एम्प्रेस व मॉडेल मिल होत. भारतीय स्वातंत्र्य युद्धातदेखील शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉॅंग्रेसची दोन अधिवेशने नागपूरात झाली व असहकार आंदोलन नागपूरच्या १९२० च्या अधिवेशनापासून सुरू झाले.१९२५ सालि डॉ.केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी नागपूर इथे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ [आरएसएस] ‘ची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार भारताच्या एक प्रांत बनला. १९५० साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली व वऱ्हाड (विदर्भ)नव्या राज्यात आला. नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता. आज, नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.

१९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.